‘सुट्ट्यांमध्ये वकीलच काम करत नाहीत’   

नवी दिल्ली : न्यायालयीन सुट्ट्यांमध्ये वकिलांच्या काम करण्यास अनिच्छेमुळे प्रलंबित खटल्यांच्या संख्येत मोठी वाढ होते, पण या विलंबासाठी न्यायव्यवस्थेला  जबाबदार धरले जाते, अशी खंत सरन्यायाधीश बी. आर. गवई व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान एका वकिलाने उन्हाळी सुट्टीनंतर अर्ज सूचिबद्ध करण्याची विनंती केली. तेव्हा मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.
 
यावर बोलताना सरन्यायाधीश म्हणाले, पहिले पाच न्यायाधीश सुट्टी असूनही काम करणार आहेत, तरीही आम्हाला प्रलंबित खटल्यांच्या वाढत्या संख्येसाठी जबाबदार धरले जाते. प्रत्यक्षात, वकीलच सुट्टीत काम करण्यास तयार नसतात.
 

Related Articles